रविवार, १६ मे, २०१०

काही चारोळ्या

) मरणप्राय यातना भोगण्यापेक्षा
मरणच यावेसे वाटते
मरण जेव्हा येऊ का विचारते
तेव्हा आणखी थोडे
जगावेसे वाटते.....

२) अर्थ साऱ्या जीवनाचा हाच आहे समजला
समजलो न मी कुणा, कुणी मला न समजला
तोही असो पण गर्व ज्याचा जीवनी मी वाहिला
आजपण त्याही यशाचा अर्थ नाही समजला...

३) अंतरीच्या यातनांना अमरता द्याय खरी
निर्मिला मी 'ताज' माझ्या शायरीचा त्यावरी
स्पर्शुनी 'त्या' शिल्पास तेथे यमुनाच वाहते
यमुनेसवे नयनांतुनी गंगाही येथे वाहते....

४) ऐसे नव्हे कि शायरी या शायरानीच गायली
कमलासवे भ्रमारादिकांनी आधीच होती गायली
पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी आम्हा दिले
फक्त त्यांच्या गुंजनाला शब्द मी माझे दिले...

५) आसवे नयनात या निर्मिली नसती कुणी
नावही शायरीचे ऐकले नसते कुणी
ज्यांनी दिला दर्द नयनी आसवेही निर्मिली
मी नव्हे,हि शायरी त्यांनीच आहे निर्मिली...

६) शेतीचे शिक्षण देता देता
त्यांनी शिक्षणाची शेती केली
मातीचे शिक्षण दूर राहिले
त्यांनी शिक्षणाचीच माती केली..

७) माणसांनी गंगेत न्हाऊन पापे धुवून घेतली
त्याचेच परिणाम आत्ता बघायला मिळतात
लाखो रुपये खर्चून तिचं माणसे
साफ-सफाईच्या मोहिमा आखतात..

८) निमूट लाटांच्या तडाख्यात
स्व:ताचे अस्तित्व शोधात
आपले स्व:ताचे असे
बरेच काही असते जपण्यासारखे
कवितेच्या वहीत बंदिस्त केलेल्या
आपल्याच गंधासारखे...

9) प्रत्येक माणसाला आपण जीवनात
काहीतरी नवीन कराव अस वाटत असत
परंतु अशा जीवनाची सुरवात कोणीतरी आधी करून गेलेला असतो
तरी प्रत्येकाला आपण काहीतरी नवीन करतो अस का वाटत असत ?

खेळ हा दोन नशिबांचा,
इथे अगदी निराळाच आहे,
दोघांची हार, नाहितर दोघांचीही जीत,
हाच ह्या खेळाचा एकुलता "नियम" आहे.

नियम चार भिंती
वर खोडकर आकाश
मन पाखरू होऊन उडत
तोडून सगळे "पाश"

तुझ्या आठवणीनी,
माझ्या भोवती पाश आवळला आहे,
होवू देत गं कहीही,
उगीचच नाही मी हा ''त्रास'' निवडला आहे...


त्रास तुझ्या असूनही नसण्याचा
भास तुझ्या नसूनही असण्याचा
काय सांगू "छंद" हा वेडा लागला
क्षणात हसण्याचा क्षणात रडण्याचा

छंद तुझ्या चारोळ्यांचा
वेड लाऊन गेला
पुन्हा पुन्हा भेटण्यासाठी
हा रोजचा नवा "बहाणा"

मनातले प्रेम लपवन्याचे,
तू अनेक बहाने केलेस,
पण चोरून पाहणा-या "नजरेला",
तू उत्तर काय दिलेस.....???

नजरेला नजर काय
बोलून गेली
तुझ आणि माझ "प्रेम"
आहे एकच सांगुन गेली

नजरेनेच दिली होती
तुझ्या प्रेमाची ग्वाही
"ओठ" माझे काय बोलणार
कदाचित त्यानिही याचीच वाट पाहिली

भावनाच एवढ्या मोठा
कि शब्धच कमी पडतात,
म्हणूनच ओठान एवजी,
त्या "डोळ्यांनी" व्यक्त होतात.

दिवाळीला खातो मी पुरण पोळी
होळीला लावतो फटाक्याच्या सरी
काव्य शब्दांकन करताच जगतोय क्षणाक्षणाला
मी चारोळ्याच्या अशाच अनेक ओळी

हवा किती बदललीय
उन्हाळ्यात सर्दी, हिवाळ्यात पाऊस
राजस्थानच्या वाळ्वन्टात
जसा पिकावा उस !

विद्वानांच्या समोर
मी धाकटाच आहे
या गर्दीत सुद्धा
मी एकटाच आहे !

एकटेपणाच काय
तो तर असतोच कायम सोबतीला
महत्वाच काय
तर कुणीच नसत बाजूला, पहायला

डोळ्यांनी पाहता येत
अगदी खोलवर मनात जाता येत
तुझ्या शब्दांनाही डोळे आहेत वाटत
त्यानाही "खोलवर" उतरता येत

बंद पापण्यांचा आडुन
तुझ्या डोळ्यातही लपल होत..
मनाच्या तळाशी खोलवर
तू माझ एक "गुपित" जपल होतस..!

एक गुपीत एकदा एका बातमीला
गुपचूप जाऊन म्हणाला
नको जास्त बघूस या "आरश्यात "
वेळ नाही लागत मला तुझ्यासारखं व्हायला

नको न्याहाळूस
तुझे "प्रतिबिंब" आरश्यात
दिसेल ते तुला
माझ्याही डोळ्यात !!

बिंब की प्रतिबिंब
एक सुलट एक उलट !
काय खर काय खोट ?
जरा "निसट"जरा पुसट !

एक क्षणच फिरवून जातो
आठवणी वरून हळुवार हात
"पहाटेच्या" तुटणा-या स्वप्नातूनच
होते सकाळची नवी सुरुवात

पहाट होताच डोळ्यांवर,
सूर्य प्रकाश आला,
"स्पर्श" होताच त्याचा,
मला तुझा भास झाला.

मनाची चल बिचल वाढवून
गेला तिचा स्पर्श
"आठवणीत" आहे अजूनही
मला तिचा हर्ष

आठवणीच काय
केव्हा ही येतात
तू दाखवलेल्या "सव्प्नाची"
आठवण करून देतात

खूप काही बोलायचय तिच्याशी
पण जीभच रेटत नाही
आग लागून सुद्धा आमचा
फटाकाच पेटत नाही!

आम्ही वाट पहातोय
त्याच्या दहाव्या अवताराची
तर त्याला आहे प्रतीक्षा
अर्जुनाच्या जन्माची!

फ्राय-डे ला ड्राय-डे
हे ज़रा जास्तच झालं
फालके पारितोषिकाला मन्ना-डे
एव्हडं फक्त छान झालं !

दुश्मन का तुम्ही दोघी
सांग मला माहित नाही
तू आणि आठवण तुझी
एक साथ येत नाही!

काही नाती तुटतात
त्यांचा आवाज होत नाही
पण, मन आतून किंचाळ्या
मारल्याशिवाय राहत नाही.

नकोत तुझ्या खोट्या प्रेमभावना
ती निरागस आठवण
माझ्या मोडलेल्या मनाला
तुझ मृगजलासामान सांत्वन.

अडवत असतो मी स्वतःला
तुझ्याकडे येताना
वाट पायात घुटमळत राहते
पाहतो तिला अडगळीतून जाताना.

मोडत असतो मी मनाला माझ्या
जोडताही असतो
जे नियतीने शिकविले मज
तेच त्यास शिकवत असतो.

जगण्याच्या वाटा बदलत गेलो
गुन्हेगार चिखलात रुतत गेलो
दैवाच्या असहाय वेदना
मी सहज झेलत गेलो.

प्रत्येकाचे इथं
ठरलेले भाव आहेत
सापडले ते चोर
बाकीचे साव आहेत

प्रेमात पडलं तरी
इजा होत नाही
ह्रदय दिलं तरी
काम अडत नाही!

किती नाही म्हंटल तरी
अपल ते आपलच असत
नाहीतर तुजासाठी माझे
रक्त सांडलच नसत.

पोठासाठीच चोरी केली,
ही चुक पुन्हा नाही,
पण भाकरिवर हक्क सांगितला,
हा काही गुन्हा नाही.

शहाणं बनण्यापेक्षा मला
वेडं व्हायला आवडेल
तुझ्या सारख्या (दिड ) शहाण्यावर
विश्वास ठेवायला आवडेल .....

"कळवा" चं झालं "कलवा"
इथं झाला कालवा
होइल सारे ठीक
थोडा पॉइंटर हलवा

इजा होते म्हणूनच...
डोळे सारखे पाणावतात
काम अडत कारण...
श्वास गोठून जातात !!!

प्रेमात पडलं तरी
इजा होत नाही
ह्रदय दिलं तरी
काम अडत नाही!

मैत्रीच्या वाटेवर
गावे खूप असतात
थांबून पाहूणचार घ्यावा
अशी थोडीच असतात!

तुझ्या विषयी बोलताना
मी ज़रा विचार करते
माझ्याशिवाय कोणी नसेल
याची मी खात्री करते .....

सोमवार, १० मे, २०१०

रंग

तुझ्या पापण्यांना रंग
देउ मी कुठले…?
जरा स्पर्श होता
तु डोळेच मिटले…?

निथळले रंग सारे
मी घट्ट बांधलेले…
त्याच रंगात होते
मी हट्ट सांधलेले…
सांग ओलावले का ?
रंग सारे तुझेही…
तप्त आभाळ सांग
का डोळ्यात भिजले?

विझलेत दिप सारे
विजांची उन्हेही…
दिले रंग मजला
जरासे तिनेही…
तो रंग चांदण्याचा
जरी त्यात होता
थेब अता मोजकेच
या ओठात उरले….

ओल श्वासातुनी
ऋतु गार वाहे…
तुझ्या नेत्री तरी
का अंधार आहे…?
सांग पाहिलेस का?
मघा तु मलाही…
रंग माझे तुझेही
का गालात हसल

स्वप्नांची परीक्रमा…

सांभाळते आता मीच माझं स्वप्नं….
देणार नाही तूला…..चुकूनही उसनं….
जमतील तसे फटकारे मारीन ब्रशचे…..
मागणार नाही तूझ्याकडे आभाळ रंगाचे…..!!
माझी स्वप्नं अलगद पापण्यांवर ठेवेन माझ्या….
मागीतली तरी तु ……देणार नाही तूला….
तशी आधीपसूनच जपते …..फूलपाखरं स्वनांची….
फूलपाखरंच ती रे……एकजात हळवी….!!!
पायवाट होती फूलांची……काळजात छळवी….
स्वप्नांचे वेचे घातले ओच्यात माझ्या…..
दिली गर्भरेशमी नक्काशी….तूच ना रे पदराला….

बघून येते माझी मीच आधीसारखी…
नाहीतरी एकटीच होते….राहीन एकटी…
येवू नकोस… आता तिथेच तु थांब…..अस्साच रहा उभा….
मी करून येते स्वप्नांची परीक्रमा…..
फूलांसारखी स्वप्ने येतात का रे आभाळाला…??

कारण…..
कोणाच्यातरी स्वप्नांनी आज…
केली म्हणे…..आत्महत्या…!!!