बुधवार, २८ सप्टेंबर, २०११
आठवणीतला पाऊस
हा पाऊस बाई बाई
कडे कपारी हिरवी गाणी.....
मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११
ऋतू समंजस....
थेंब थेंब पावसाचा....
शनिवार, २४ सप्टेंबर, २०११
पाऊस आला कि...
बुधवार, २१ सप्टेंबर, २०११
आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!
बघ माझी आठवण येते का?
श्रावणाची पहीली सर आज पुन्हा दारी आली.......
पाउस असा हा झरतो
एखादा पावसाळा............!!!!!!!!
नको नको रे पावसा ...!!
आला आषाढ-श्रावण
एकटेपण..
एकटेपण.. कधी पहाटेच्या दवाच्या टिपासारखं,रसिक, कधी हळवं, कधी नादखुलं, कधी व्यवहारी, कधी भाबड़, कधी रागीट, कधी हसरं, वेड ते एकटेपण, आणि वेडा तो थेंब.. साथ असली त्याची, तरी सोबत नसत मन |
भरून आलेलं आभाळ....................
भरून आलेलं आभाळ जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व तेव्हा मला कळू लागतं...
धावून येणारा पाऊस, नखशिखान्त भिजवू पाहतो...
बेधुंद.. बेभान वाऱ्याला, जबरदस्तीने थिजवू पाहतो...
मनाच्या कोपऱ्यात तुझी आठवण, पुन्हा घरटं बांधते...
आणि.. प्रीतिचं वेडं पाखरू... पुन्हा त्यावर घोटाळू लागतं...
भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...
जमिनीवर पडणारं पाणी, ओढ्याचं रुप घेऊन धावतं...
पावसाचं हे चैतन्य, निसर्गाच्या ओंजळीत सामावतं...
तहानलेली धरती तृप्त होऊन, हिरवा शालू पांघरते...
माझं मन मात्र मातीच्या सुगंधात मिसळू लागतं...
भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...
अशा धुंद वातावरणात, मी सहज फिरायला निघतो...
सभोवतीच्या मोहकतेला नजरेनेच प्यायला बघतो...
चालता चालता वाटेवरचं, ते ओळखीचं वळण येतं...
तू तिथे पुन्हा भेटावंस... हे माझं स्वप्न, वास्तवात विरघळू लागतं...
भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...
सृष्टीचं सौंदर्य पाहून, मी मुग्धच होऊन राहतो...
मनाच्या दर्पणातही पुन्हा, तुझेच प्रतिबिंब पाहतो...
दूरवर पेटलेल्या शेकोटीची धग, अंगाला जाणवू लागते...
माझं मन मात्र एकांताच्या, आगीतच जळू लागतं...
भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...
जेव्हा कधी तुझ्या आठवणी मनामध्ये दाटून येतात...
मला पुन्हा भूतकाळात खेचून नेतात...
वेदनांचा श्रावण पुन्हा एकवार मुसळधार बरसू लागतो...
अन हृदयीचं दु:ख अश्रू बनून डोळ्यांवाटे ओघळू लागतं...
भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...
दोन थेंब...
मग दूसरा बोलला,"मी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतोय."
"आता काही मैलांचा प्रवास उरलाय,
"आयुष्याच्या शेवटीच तर अंतर्मुख व्हाव लागत.
कपाळमोक्ष तर ठरलेलाच आहे!"
"मग आपल्या हाती काहीच नसताना
विचार करुन आणि अंतर्मुख होउन
काय करणार आहेस?
त्यापेक्षा छान गप्पा मारू आणि वेळ आली,
की अनंतात विलीन होउन जाऊ."
"त्याने काय होणार?
कपाळमोक्ष टळणार आहे का आपला?"
"अच्छा, म्हणजे तुला काळजी लागुन राहिली आहे
ती तुझ अस्तित्व संपून जाण्याची!"
"का?तुला नाही लागुन राहिली आहे काळजी?"
"नाही.आपला ढगात जन्म होतो,
त्याच क्षणी अपल भवितव्य ठरलेल असत
.ढगाला आपला भार असह्य झाला,
की तो आपल्याला सोडून देणार.
मग गुरुत्वाकर्षणाच्या ताब्यात जाउन
खाली डोक वर शेपुट असा आपला प्रवास सुरु होतो.
यात आपण काय करू शकतो?"...
"हे बघ, अपाला कपाळमोक्ष होतो म्हणजे काय?
"मी थेंब आहे आणि पडल्यावर थेंब राहणार नाही, एवढ मला कळत."
"तू पाणी आहेस आणि पाणीच राहणार आहेस,
"बरा भेटलास,बोल
"अरे,गप्पा मारायला काय हजार विषय आहेत
"हा काय प्रश्न झाला?"
"अरे तुला काय खूळ लागल का?
"चूक!"
"हे बघ, आपण पडतो त्याला
"पण, समज आपण स्वताचा असा
"बापरे, मी हा असा विचारच केला नव्हता कधी..."
"समज,
"आता कस बोललास?
"अरे गम्मत! ज़रा विचार तर करुन बघ.
एक आजोबा हातात पिशवी सांभाळत,
वाऱ्याने उलटी होत असलेली
छत्री सावरत कसेबसे चालत होते.
पहिला थेंब त्यांच्या छत्रीवर पडला
आणि मग घरंगळत जमिनीवर पडला.
चाफ्याच डौलदार झाड़
दुधाळ फुल अंगावर लेवून
हिरवी वस्त्र नेसून सजल होत
.भार सहन न होउन पान वाकल आणि
थेंबन जमिनीवर उडी घेतली.
तितक्यात पहिल्यान दुसर्याला मिठीत झेलल.
दूसरा म्हणाला,"आता मी वाट बघतोय,
वाफ होउन ढगात जाण्याची आणि
पुन्हा थेम्ब होउन बरसन्याची.
थेम्ब होउन पडण्यात किती मजा असते, ते मला आज कळल!".
मंगळवार, २० सप्टेंबर, २०११
पाऊस तुझ्या आठवणींचा......
तरीही कोरडच आहे मी
पाऊस तुझ्या आठ्वनींचा.........
दिवस रात्र कोसळणारा
तरीही तहानलेलाच आहे मी
पाऊस तुझ्या आठवणींचा......
तुझ्या खोट्या प्रेमाची साक्ष देणारा
तरीही प्रेम करतोच आहे मी...........तुझ्यावर
पाऊस तुझ्या आठवणींचा......
आसवांचे महापुर घेउन येनारा
तरीही हसतोच आहे मी
पाऊस तुझ्या आठवणींचा......
जगण्यापेक्षा मरण चांगल वाटायला लावणारा
तरीही जगतोच आहे मी
तरीही जगतोच आहे मी
रविवार, १८ सप्टेंबर, २०११
कसे सांगू पावसाला?
घर असे हे पडके
जणू घर नाही आता
आहे ओले हे थडगे
घरी असा एकटा मी
म्हातारा कुचकामी
पुत्रदर्शन दुर्मिळ
सणावारी कधीकाळी तो दारी या
धडके कसे सांगू पावसाला? वर छप्पर गळके
चार पैसे धाडी मला
ठेवाया नोकरगडी घरा
दोन बोटे पत्र नाही
बाळा संपली का शाई?
असे कसे मन ह्याचे
झाले कठोर कोडगे
कसे सांगू पावसाला? वर छप्पर गळके
लोक हसती मला
उगाच उपहास
हा औषधांचा मारा
पथ्य आणि उपवास
वर अंगावर नाही
धुपे सुके फडके
कसे सांगू पावसाला? वर छप्पर गळके
आता येऊ दे
पूर संपू दे किरकिर
कुणी मारेल खांदा
कुणी धरेल मडके
कसे सांगू पावसाला? वर छप्पर गळके
पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या॥
आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या॥
आलाय पाऊस…..भिजून घ्या
ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या॥
आलाय पाऊस…..भिजून घ्या
सर्दी पडसे रोजचेच॥
त्याला औषध तेच तेच॥
प्यायचेच आहेत नंतर काढे,
आधी अमृत पिऊन घ्या॥
आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या॥
आलाय पाऊस…..भिजून घ्या
आला आला पावसाळा
ही रचना पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसिद्द झाली आहे.
दूर गेल्या ग्रीष्म झळा पळाला उन्हाळा स्रुष्टीला या सजवाया आला पावसाळा १
पावसात खेळायला चला सारे जाऊ भिजताना पावसाची गाणीपण गाऊ २
नका कुणी उघडू रे काळी कुट्ट छत्री पावसाशी सारे जण करू घट्ट मैत्री ३
वेगे वेगे अंगावरी झेलू जलधारा भरे जरी हुडहुडी तरी वेचू गारा ४
"थेंबे थेंबे साचे तळे" शिकू अशा म्हणी मनामध्ये साठवता विसरे ना कुणी ५
खळाळत्या ओहोळात सोडू खूप होड्या कुरबुरी करू नका केल्या कुणी खोड्या ६
माशासम पाण्यामध्ये पोहू या कां सारे?किंवा मोर होऊनिया फुलवू पिसारे ७
तळ्यावरी भिरकावू थोड्या ठिक-या आईपेक्षा मोठ्या थापू सा-या भक-या ८
तां ना पि हि नि पां जां इंद्रधनू रंग भान हरपुनी पाहू सात रंग संग ९
धरित्रिच्या अंगावरी बरसता थेंब पहा झणी फुटताती हिरवेसे कोंब १०
थांबू थोड़े, राहू उभे पाघोळ्याच्या खाली मोतीयाचे थेंब सजे प्रत्येकाच्या गाली ११
गारठुनी अंगावरी येताच शहारे,कानावर तेंव्हा पड़े आईच्या हाका रे १२
सटासट, लगोलग नका कुणी शिंकू गारा वेचण्याची स्पर्धा कोण शके जिंकू? १३
मुक्तपणे चरताती गुरे कुरणांत घुंगरांच्या माळा गळा घुणघुणतात १४
झाडांच्या त्या फांद्यावरी जमतील पक्षी खेळ मौजेचा आपुला तेथुनी निरीक्षी १५
रोज उगायचा वसा सूर्य विसरला किरणांचा गालिच्छा कां अन्य पसरला? १६
सोसाट्याचा वारा नेई पावसाला दूर चिंब भिजू तोवरीच खेळू भरपूर १७
आला आला म्हणतांना गेला रे पाऊस कल्पनेच्या विश्वामध्ये फिटली रे हौस १८
शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११
विरहाचा पाऊस
मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११
एक दिवस सायकलचा....
दिवस निघाल्यापासूनच,
सुरु होते वाहनांची गर्दी,
अन पायी चालणार्यांची इथ,
लागत नाही वर्दी...
प्रदूषण वाढल म्हणणारे
आहे इथ दर्दी,
खर पाहायल गेल तर त्यांच्याच
घरी वाहनांची गर्दी...
एक माणूस एक वाहन,
अशी आजची स्थिती,
अन अपघातात मराची
सार्यायलेच लागते भीती...