शनिवार, २५ डिसेंबर, २०१०

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...
चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

ताप नको मज कुठलाही अन व्याप नको आहे
उत्तर कुठले? मुळात मज प्रश्न नको आहे!
या प्रश्नांशी अवघ्या करार मी केला
मी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला !
बधिरतेच्या पुंगीवारती मी नागोबा डुलतो....

आता आता छाती केवळ भीती साठवते
डिंगर बघता उंची नाही, खोली आठवते!
आत कुठल्या दिलखुश गप्पा उदार गगनाशी?
आत नाही रात्रही उरली पूर्वीगत होशी!
विलान्दारीने कालान्दारीचे गाणे मी गातो...

कळून येत जगण्याच्या या इवूल्याश्या त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा!
दरी नाही फिरकत कुठला नवा छंद, चाळा
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा
कंटाळ्याचादेखील आत कंटाळा येतो....

शनिवार, १६ ऑक्टोबर, २०१०

कलंदर

जगातील सगळीच माणस कशानतरी भारलेली असतात या भारलेपणातच काहीतरी विशेष असतं अन्यथा जीवन म्हणजे भकास वाळवंट होऊन जाईल. रितेपणाचं वा निवृतीचं जीवन जगण खूपच कठीण असतं. यामुळे कशात तरी मन गुंतवण आलचं! सगळी यशस्वी माणसं कोणत्या न कोणत्या तरी शक्तीने भारलेली होती. इतिहासात याच्या अनेक नोंदी सापडतील. त्यांची वाट साधी सोपी नव्हतीच, मात्र, त्यांनी अनेक अडचणींवर झुंजून मात केली आणि आमचा ठसा उमटविलेला दिसतो.
आजकालच जीवनच मुळी घड्याळ्याच्या काट्यावर धावणारे आहे. भारलेल्या दशेत अंगात नुसती झिंग चढलेली आहे. आपुलकी जिव्हाळा प्रेम, मायेचे चार शब्द ऐकणे दुरापास्त झालेले आहे. सगळीकडे कसा टापटीपपणाचा चकचकाट दिसून येतो. भावनेची जागा पैशाने घेतली. आणि संवेदना रापास्त झाली. हे विदारक सत्य निस्सीम आनंदापासून शेकडो मैल दूर पडले आहे.
खरा कलावंत कलंदर माणूस व्यवहारीपणाच्या बुरख्यात अधिक काळ जखडून राहू शकत नाही. निसर्गातील अनेक घटक त्याला साद घात असतात. त्या घटकांकडे तो विजेच्या चपळाईने धाव घेत असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षणातील आनंद वा दुखः उपभोगण्यासाठी आसुरलेल असतं. गत आयुष्यातल्या बर्या वाईट गोष्टीत मन घुटमळत असते. प्रत्येकवेळी नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करते... निरपेक्ष भावनेने...!

"आयुष तेच आहे आणि हाच पेच आहे
तू भेटशी नव्याने बाकी सारे जुनेच आहे."

या कवितेत आंतरिक तळमळ व्यक्त करण्यात आली आहे. प्रवाहात अनेक माणसं भेटतात, हसतात, साथ-सोबत करतात. पुढे कालांतराने दुरावतात. आपली माणसं दूर गेल्याचं दुखः खूप मोठ असतं. पण., दुःखाची मैत्री करण्याचं सामर्थ्य कलंदरामध्ये नक्कीच असतं. पुढे कधीतरी ती माणसं पुन्हा भेटतात. जुन्या आठवणी ताज्या होतात. सार विश्व नव्यानं प्रगटत. पण, वेळ गेलेली असते. पुन्हा भरेल कि नाही याची शाश्वती नसते. आणि मनाशी प्रतारणा होणार नाही. याची भीती नेहमीच डोकावत असते यामुळे कलंदराला अनेक सुखांवर पाणी सोडावे लागते.

रविवार, ३ ऑक्टोबर, २०१०

भक्ती!

बळीराजाला पेरणी मशागतीतून उसंत मिळाली... पावसाने धो, धो, कोसळून सुट्टी घेऊन... ऊन पावसाचा खेळ सुरु झाला... अंकुरलेले बीज ऊन पाणी, वार्याबरोबर डोलू लागले... किवा चैतन्याचे वारे वाहू लागले कि सण, उत्सव सुरु होतो. भक्ती अशी शक्ती आहे , कि जिच्यामुळे सर्वस्व पणाला लागले तरी, विश्वास ढळू शकत नाही. मराठी समाजाला संतश्रेष्ठांची मांदियाळी लाभलेली आहे. ज्यांनी अनेकवर्षे तलवारीच्या जोरावर जे करू शकले नाहीत ते संतांनी केवळ भक्तीच्या जोरावर साध्य केले. आत्मसमर्पणाची भावना जेव्हा वाढीला लागते तेव्हां भक्ती जन्म घेते.
पंढरपूरचा विठ्ठल अवघ्या मराठी मनाच श्रद्धास्थान. दरवर्षी आषाढी, कार्तीकेला लाखो वारकरी नित्यनेमाने पंढरपूरला जातात. पायी निघालेली वारी हा भक्तीचा महासागर असतो. समाजातल्या अठरापगड जाती एकभावनेने, एक प्रेरणेने, एक लक्षाने, एक विश्वासाने आणि एक दिलाने वारीमध्ये सामावतात. असंख्य स्त्र्र-पुरुष चैतन्याच्या वातावरणात अवर्णनीय सुखाची अनुभूती ते अनुभवत असतात. आयुष्यातल्या खाच्ख्लाग्यानी खंगत असलेल्या मनाला नवी उभारे देण्याच सामर्थ्य भक्तीमध्ये असत.
"अवघाची संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तीनही लोक
जाईन गे माये त्या पंढरपुरा
भेटेन माहेरा आपुलिया"
हि सुखाची कल्पना कीर्ती सोज्वळ, सुंदर आणि सात्विक आहे। मनाला कोंडून ठेवणे जितके कठीण तितकेच कठीण असते। मनाचे वर्णन करणे, माणूस कितीही नास्तिक असो, तो कशावरती जीव लावतोच आणि जीव लावणे म्हणजेच भक्ती जडणे, आयुष्यातील सगळेच प्रसंग एकसारखे नसतात। आणि ते नसावेतही। प्रत्येक क्षण काहीतरी नवंवा नव्याने शिकवून जातो. तो अनुभवण्याची पर्यायाने शिकण्याची कला, मात्र आपल्याकडे असावी लागते. केवळ एका आशेच्या कवडशावर आयुष्य सुसह्य करता येते.
श्रद्धा हि व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपातही असते. भक्त देवावर एकतर्फी प्रेम करत असला तरी त्यातून मिळणारी अनुभूती लाखमोलाची असते. आणि यामुळेच पावसाच्या रिपरीपित, वार्याच्या घोन्गावात काटयाकुट्याच्या रस्त्यावर डोकीवर तुळशीवृंद हेऊन वारीत सामील झालेल्या स्त्रीच्या तोंडी
" टाळी वाजवावी, गुढी उभारावी
वाटही चालावी पंढरीची!"
असेच शब्द आहेर पडतात. भक्तीला मोल नाही. सुख-दुखाचा पाढा वाचायला वेळ नाही, भक्ती फक्त भक्ती असते. ती मनातून जन्मते आणि नसानसातून भिनते.

तरुणाई


तरुणाई हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय! सर्वांचा हवाहवासा वाटणारा हा जीवनाचा टप्पा! उत्साह, धैर्य, शक्ती, बिनधास्तपणा यांनी ओसंडून वाहणारा प्रवाह! या काळात प्रत्येक जफास्ट्रकवर राहण्याची अपेक्षा बाळगून असतो. तसेच स्वतःच वेगळ विश्व निर्माण करण्याच्या घाईगडबडीत असतो. आणि हळुवार पावलांनी हे मोरपंखी दिवस कसे संपून जातात हे कळत नाही.
शिक्षण, नोकरी, व्यावसाय मित्रमैत्रिणी व जीवनसाथी निवडणे अशा अनेक आघाडयांवर एकाचवेळी लक्ष केंद्रित करायचे असते. यातच स्पर्धेच युग! या युगात स्वतःचा वेगळा कस निर्माण करण्याचे आव्हान. चालताना., बसमध्ये, वाहन चालवताना, मोबाईलवर बोलताना, काम करताना निव्वळ आणि निव्वळ धांदल.कितीही दगदग आणि तणाव असला तरी या वयाची लज्जतच काही और असते यामुळे तरुणाई नेहमीच स्मरणात राहते.
तरुणाई म्हणजे उत्साह. उमेद, प्रेम आणि धैर्याचा सुरेख मेळ....! कालानुरूप तरुणाई मधेही खूप फरक पडतो. कुठे बनगरवाडीतील धोतराचा सोगा पकडून शाळेतील विद्यार्थी शोधणारा तरुण शिक्षक तर कुठे आजचा इंग्रजी हाय-फाय बोलत बीपीओ, कॉलसेंटरमध्ये गडगंज पैसा कमावणारा तरुण.यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तरुणाई म्हणजे हुरहूर, तरुणाई म्हणजे दगदग.... तरुणाई म्हणजे बडबड तरुणाई म्हणजे गडबड, गोंधळ
तरुणाईचा काळ म्हणजे नाविन्याचा शोध घेण्यासाठी निसर्गाने उभारलेल मुक्त विद्यापीठ. जिज्ञासा, निकोप दृष्टीकोन आणि समजूतदारपणा यामुळे जीवनाला गहीरेपानाचे रंग प्राप्त जातात. या उमेदीच्या काळात माणूस घडत असतो, भरारी घेत असतो, बिघडत असतो, कोसळत असतो. मात्र त्याच्या पाहणार्याच्या दृष्टीकोनावर बदल घडत असतात. हा काळ जितका लाभदायक, तितकाच धोकादायक. तरुणाईच्या नाक्यावर अनेक वाटा फुटलेल्या असतात. मनाला आवरणे अतिशय कठीण होऊन जाते. येथून फक्त एकाच वाट निवडावी लागते. जी पुढे आपली जीवनरेषा होऊन जाते.
प्रचंड शक्तीचा अदभूद साठा असलेल्या तरुणाईचा वापर झाल्यास अनेक विधायक कार्ये अगदी सहजपणे होऊन जातात. याची अनेक उदा. देता येतील. पण व्यसनाधीनतेच्या गर्केत वाढणारी तरुणाई विघातक ठरतात. यामुळे तरुणाई हा अमुल्य वेळ आहे. याचा वापर फुलण्यासाठीच करावा.
वय हलक्या हलक्या पावलांनी जरी निघून जात असले तरी मनाने सदैव तरुण राहिलेल्या तरुणाईची गर्द निळाई अनुभवण्यास येईल.

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

माझ्या महाराष्ट्रीयन बंधूनो!

माझ्या महाराष्ट्रीयन बंधूनो!
माझ्या महाराष्ट्रियन बंधू भगिनींनो
ऐका आपल्याच भावंडांचा आर्त टाहो
पन्नास वर्षाच्या स्वातंत्र्यातही
कर्नाटक राज्यात आम्ही गुलाम हो!

होते, आहोत, असू मराठे
जन्मजात आम्ही महाराष्ट्रीय बेटे
मायमराठी हि दुधामृत वाटे
परी जीवन आमुचे तिथे करंटे

रथी महारथी थोर योद्धे मराठी
गेले खंगुनी गांधीमार्ग आचरुनी
सत्याग्रहाचे तत्व त्या कर्नाटकी
नसूनी टाकले त्या कुराज्यकर्त्यांनी!

मान सन्मान भारतात माझ्या
स्वातंत्र्य भोगण्या मिळे इतरांना
आम्ही मराठे २० लाख असताना
कर्नाटकातील गुलाम म्हणा ना !

मराठी शिकणे आणि लिहिणे
गुन्हाच येथे मातृभाषा बोलणे
नाही नोकरी नाही धंदा-काम
तिथे वेळोवेळी आहे सहणे अपमान

खावालुनी उठू सभामोर्चात जमत गणांचे
रक्त शिवगणांचे सळसळू लागे
गल्लीत अडवून पोळीचे मारती
रक्तात डोकी पथ रंगवू लागे !

मुंबई दिल्ली वार्या करुनी
दमात आले बाबा म. ए. स. नेते
वाटाळ गोकाक कानडी मस्ते
'सीमाप्रश्नाच्या' मान्गुतीस भुते!

'एक इंच भूमिही मिळणार नाही!
कन्नड कौरवजन उर्मट वदती
असुनी खरी हि महाराष्ट्र भूमी
महाराष्ट्र पांडव द्यूतात हरती!

'मराठू मातेच्या पदरी घाला हो
दिल्लीश्वरापुढे फोडला टाहो
'संपूर्ण महाराष्ट्र ही आर्त आरोळी
कानी पडती तरी ऐकू न घेती हो

संग माझ्या महाराष्ट्र बांधवा,
बेळगाव, खानापूर, निपाणीच्या लोक
राहू कर्नाटकी असे रडत- सडत
कि तिथेच मारावे " जय महाराष्ट्र " म्हणत???
सीमावासी कवी- जोतीबा पाटील.

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०१०

रंगवुनि स्वप्न माझे-

रंगवुनि स्वप्न माझे-

निघुनी का गेलास तू?

जीवनाचा अर्थ मजला

सांगुनि गेलास तू!

जीवनाचे चित्र माझ्या

आज मी रे रेखिले!


रंग त्याचा होऊनी अन्‌

उडूनि का गेलास तू?

मूर्ति तव मी नयनि माझ्या

होती रे रेखाटली-

अश्रुधारा होऊनी अन्‌

निघुनी का गेलास तू?

चित्र अपुरे…स्वप्न अधुरे

सांग रे फुलवू कशी

मीलनाची आस मज का-

लावूनि गेलास तू?’

बुधवार, २१ जुलै, २०१०

पहिला पाऊस पडतो तेंव्हा...

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ....
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार् या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ

पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे , मोगर् यापाशी
तळं होऊन साचायचं !

आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील

ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं !
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं !

म्हणून ..
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !

2. पाऊस आलाय….भिजून घ्या
पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

शनिवार, १० जुलै, २०१०

पाऊस...

पाऊस...
गोष्ट सुरु होइल तेव्हा सुरु झाला पाहिजे...
गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे...

गोष्टीतल्या पात्रामध्ये रमला पाहिजे...
नायीकेमागे धावताना दमला पाहिजे...
दोघानमधल्या रागासारखा
लटका लटका भांडला पाहिजे...
नंतर तिच्या डोळ्यामधून
सर सर सांडला पाहिजे...

सुखदुखाच्या होडीतून दुरवर तरंगताना
मधेच भान यावे आणि पहावे तर पाऊस!
'हा कधी आला ' म्हणावे हसून ..
मागे रेलून... डोळे मिटून...
मग आठवावी आपली एखादी गोष्ट-
-तर तिथेही पाऊस !........

रविवार, १६ मे, २०१०

काही चारोळ्या

) मरणप्राय यातना भोगण्यापेक्षा
मरणच यावेसे वाटते
मरण जेव्हा येऊ का विचारते
तेव्हा आणखी थोडे
जगावेसे वाटते.....

२) अर्थ साऱ्या जीवनाचा हाच आहे समजला
समजलो न मी कुणा, कुणी मला न समजला
तोही असो पण गर्व ज्याचा जीवनी मी वाहिला
आजपण त्याही यशाचा अर्थ नाही समजला...

३) अंतरीच्या यातनांना अमरता द्याय खरी
निर्मिला मी 'ताज' माझ्या शायरीचा त्यावरी
स्पर्शुनी 'त्या' शिल्पास तेथे यमुनाच वाहते
यमुनेसवे नयनांतुनी गंगाही येथे वाहते....

४) ऐसे नव्हे कि शायरी या शायरानीच गायली
कमलासवे भ्रमारादिकांनी आधीच होती गायली
पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी आम्हा दिले
फक्त त्यांच्या गुंजनाला शब्द मी माझे दिले...

५) आसवे नयनात या निर्मिली नसती कुणी
नावही शायरीचे ऐकले नसते कुणी
ज्यांनी दिला दर्द नयनी आसवेही निर्मिली
मी नव्हे,हि शायरी त्यांनीच आहे निर्मिली...

६) शेतीचे शिक्षण देता देता
त्यांनी शिक्षणाची शेती केली
मातीचे शिक्षण दूर राहिले
त्यांनी शिक्षणाचीच माती केली..

७) माणसांनी गंगेत न्हाऊन पापे धुवून घेतली
त्याचेच परिणाम आत्ता बघायला मिळतात
लाखो रुपये खर्चून तिचं माणसे
साफ-सफाईच्या मोहिमा आखतात..

८) निमूट लाटांच्या तडाख्यात
स्व:ताचे अस्तित्व शोधात
आपले स्व:ताचे असे
बरेच काही असते जपण्यासारखे
कवितेच्या वहीत बंदिस्त केलेल्या
आपल्याच गंधासारखे...

9) प्रत्येक माणसाला आपण जीवनात
काहीतरी नवीन कराव अस वाटत असत
परंतु अशा जीवनाची सुरवात कोणीतरी आधी करून गेलेला असतो
तरी प्रत्येकाला आपण काहीतरी नवीन करतो अस का वाटत असत ?

खेळ हा दोन नशिबांचा,
इथे अगदी निराळाच आहे,
दोघांची हार, नाहितर दोघांचीही जीत,
हाच ह्या खेळाचा एकुलता "नियम" आहे.

नियम चार भिंती
वर खोडकर आकाश
मन पाखरू होऊन उडत
तोडून सगळे "पाश"

तुझ्या आठवणीनी,
माझ्या भोवती पाश आवळला आहे,
होवू देत गं कहीही,
उगीचच नाही मी हा ''त्रास'' निवडला आहे...


त्रास तुझ्या असूनही नसण्याचा
भास तुझ्या नसूनही असण्याचा
काय सांगू "छंद" हा वेडा लागला
क्षणात हसण्याचा क्षणात रडण्याचा

छंद तुझ्या चारोळ्यांचा
वेड लाऊन गेला
पुन्हा पुन्हा भेटण्यासाठी
हा रोजचा नवा "बहाणा"

मनातले प्रेम लपवन्याचे,
तू अनेक बहाने केलेस,
पण चोरून पाहणा-या "नजरेला",
तू उत्तर काय दिलेस.....???

नजरेला नजर काय
बोलून गेली
तुझ आणि माझ "प्रेम"
आहे एकच सांगुन गेली

नजरेनेच दिली होती
तुझ्या प्रेमाची ग्वाही
"ओठ" माझे काय बोलणार
कदाचित त्यानिही याचीच वाट पाहिली

भावनाच एवढ्या मोठा
कि शब्धच कमी पडतात,
म्हणूनच ओठान एवजी,
त्या "डोळ्यांनी" व्यक्त होतात.

दिवाळीला खातो मी पुरण पोळी
होळीला लावतो फटाक्याच्या सरी
काव्य शब्दांकन करताच जगतोय क्षणाक्षणाला
मी चारोळ्याच्या अशाच अनेक ओळी

हवा किती बदललीय
उन्हाळ्यात सर्दी, हिवाळ्यात पाऊस
राजस्थानच्या वाळ्वन्टात
जसा पिकावा उस !

विद्वानांच्या समोर
मी धाकटाच आहे
या गर्दीत सुद्धा
मी एकटाच आहे !

एकटेपणाच काय
तो तर असतोच कायम सोबतीला
महत्वाच काय
तर कुणीच नसत बाजूला, पहायला

डोळ्यांनी पाहता येत
अगदी खोलवर मनात जाता येत
तुझ्या शब्दांनाही डोळे आहेत वाटत
त्यानाही "खोलवर" उतरता येत

बंद पापण्यांचा आडुन
तुझ्या डोळ्यातही लपल होत..
मनाच्या तळाशी खोलवर
तू माझ एक "गुपित" जपल होतस..!

एक गुपीत एकदा एका बातमीला
गुपचूप जाऊन म्हणाला
नको जास्त बघूस या "आरश्यात "
वेळ नाही लागत मला तुझ्यासारखं व्हायला

नको न्याहाळूस
तुझे "प्रतिबिंब" आरश्यात
दिसेल ते तुला
माझ्याही डोळ्यात !!

बिंब की प्रतिबिंब
एक सुलट एक उलट !
काय खर काय खोट ?
जरा "निसट"जरा पुसट !

एक क्षणच फिरवून जातो
आठवणी वरून हळुवार हात
"पहाटेच्या" तुटणा-या स्वप्नातूनच
होते सकाळची नवी सुरुवात

पहाट होताच डोळ्यांवर,
सूर्य प्रकाश आला,
"स्पर्श" होताच त्याचा,
मला तुझा भास झाला.

मनाची चल बिचल वाढवून
गेला तिचा स्पर्श
"आठवणीत" आहे अजूनही
मला तिचा हर्ष

आठवणीच काय
केव्हा ही येतात
तू दाखवलेल्या "सव्प्नाची"
आठवण करून देतात

खूप काही बोलायचय तिच्याशी
पण जीभच रेटत नाही
आग लागून सुद्धा आमचा
फटाकाच पेटत नाही!

आम्ही वाट पहातोय
त्याच्या दहाव्या अवताराची
तर त्याला आहे प्रतीक्षा
अर्जुनाच्या जन्माची!

फ्राय-डे ला ड्राय-डे
हे ज़रा जास्तच झालं
फालके पारितोषिकाला मन्ना-डे
एव्हडं फक्त छान झालं !

दुश्मन का तुम्ही दोघी
सांग मला माहित नाही
तू आणि आठवण तुझी
एक साथ येत नाही!

काही नाती तुटतात
त्यांचा आवाज होत नाही
पण, मन आतून किंचाळ्या
मारल्याशिवाय राहत नाही.

नकोत तुझ्या खोट्या प्रेमभावना
ती निरागस आठवण
माझ्या मोडलेल्या मनाला
तुझ मृगजलासामान सांत्वन.

अडवत असतो मी स्वतःला
तुझ्याकडे येताना
वाट पायात घुटमळत राहते
पाहतो तिला अडगळीतून जाताना.

मोडत असतो मी मनाला माझ्या
जोडताही असतो
जे नियतीने शिकविले मज
तेच त्यास शिकवत असतो.

जगण्याच्या वाटा बदलत गेलो
गुन्हेगार चिखलात रुतत गेलो
दैवाच्या असहाय वेदना
मी सहज झेलत गेलो.

प्रत्येकाचे इथं
ठरलेले भाव आहेत
सापडले ते चोर
बाकीचे साव आहेत

प्रेमात पडलं तरी
इजा होत नाही
ह्रदय दिलं तरी
काम अडत नाही!

किती नाही म्हंटल तरी
अपल ते आपलच असत
नाहीतर तुजासाठी माझे
रक्त सांडलच नसत.

पोठासाठीच चोरी केली,
ही चुक पुन्हा नाही,
पण भाकरिवर हक्क सांगितला,
हा काही गुन्हा नाही.

शहाणं बनण्यापेक्षा मला
वेडं व्हायला आवडेल
तुझ्या सारख्या (दिड ) शहाण्यावर
विश्वास ठेवायला आवडेल .....

"कळवा" चं झालं "कलवा"
इथं झाला कालवा
होइल सारे ठीक
थोडा पॉइंटर हलवा

इजा होते म्हणूनच...
डोळे सारखे पाणावतात
काम अडत कारण...
श्वास गोठून जातात !!!

प्रेमात पडलं तरी
इजा होत नाही
ह्रदय दिलं तरी
काम अडत नाही!

मैत्रीच्या वाटेवर
गावे खूप असतात
थांबून पाहूणचार घ्यावा
अशी थोडीच असतात!

तुझ्या विषयी बोलताना
मी ज़रा विचार करते
माझ्याशिवाय कोणी नसेल
याची मी खात्री करते .....

सोमवार, १० मे, २०१०

रंग

तुझ्या पापण्यांना रंग
देउ मी कुठले…?
जरा स्पर्श होता
तु डोळेच मिटले…?

निथळले रंग सारे
मी घट्ट बांधलेले…
त्याच रंगात होते
मी हट्ट सांधलेले…
सांग ओलावले का ?
रंग सारे तुझेही…
तप्त आभाळ सांग
का डोळ्यात भिजले?

विझलेत दिप सारे
विजांची उन्हेही…
दिले रंग मजला
जरासे तिनेही…
तो रंग चांदण्याचा
जरी त्यात होता
थेब अता मोजकेच
या ओठात उरले….

ओल श्वासातुनी
ऋतु गार वाहे…
तुझ्या नेत्री तरी
का अंधार आहे…?
सांग पाहिलेस का?
मघा तु मलाही…
रंग माझे तुझेही
का गालात हसल

स्वप्नांची परीक्रमा…

सांभाळते आता मीच माझं स्वप्नं….
देणार नाही तूला…..चुकूनही उसनं….
जमतील तसे फटकारे मारीन ब्रशचे…..
मागणार नाही तूझ्याकडे आभाळ रंगाचे…..!!
माझी स्वप्नं अलगद पापण्यांवर ठेवेन माझ्या….
मागीतली तरी तु ……देणार नाही तूला….
तशी आधीपसूनच जपते …..फूलपाखरं स्वनांची….
फूलपाखरंच ती रे……एकजात हळवी….!!!
पायवाट होती फूलांची……काळजात छळवी….
स्वप्नांचे वेचे घातले ओच्यात माझ्या…..
दिली गर्भरेशमी नक्काशी….तूच ना रे पदराला….

बघून येते माझी मीच आधीसारखी…
नाहीतरी एकटीच होते….राहीन एकटी…
येवू नकोस… आता तिथेच तु थांब…..अस्साच रहा उभा….
मी करून येते स्वप्नांची परीक्रमा…..
फूलांसारखी स्वप्ने येतात का रे आभाळाला…??

कारण…..
कोणाच्यातरी स्वप्नांनी आज…
केली म्हणे…..आत्महत्या…!!!

गुरुवार, १५ एप्रिल, २०१०

हात तुझा हातात अन धूंद ही हवा

हात तुझा हातात अन धूंद ही हवा
रोजचाच चंद्र आज, भासतो नवा

रोजचेच हे वारे, रोजचेच तारे
भासते परी नविन विश्व आज सारे
ही किमया स्पर्शाची, भारीते जीवा

या हळव्या पाण्यावर, मोहरल्या छाया
मोहरले हृदय तसे, मोहरली काया
चांदण्यात थरथरतो, मधुर गारवा

जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो
स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो
बिलगताच जाईचा उमलतो थवा

क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे
विरघळून चंद्र आज, रक्तातून वाहे
आज फुले प्राणांतून, केशरी दिवा

शनिवार, २३ जानेवारी, २०१०

दूरदेशी गेला बाबा…

दूरदेशी गेला बाबा… गेली कामावर आई

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही !! ध्रु !!

कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला

चार भिंतित धावुन दिसभर दमवला

‘ आता पुरे ! झोप सोन्या..’ कुणी म्हणतच नाही

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?

कोणी बोलायाला नाही…कशी व्हावी कट्टी-बट्टी ?

खेळ ठेवले मांडून … परि खेळगडी नाही !! २ !!

दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही

दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही

फार वाटे जावे परी – मुठीमध्ये बोट नाही !! ३ !!

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही दूरदेशी गेला बाबा……

- संदिप खरे

बाकी...

होते का ते नुसते
येणे आणिक जाणे
होत्या का त्या नुसत्या गप्पा
क्षेमकुशल अन स्मरणे ;

होते का ते नुसते फिरणे -
करड्या चढणीवरुणी
हिरवी उतरण घेणे
होते का ते नुसते बघणे
क्षितीजावरची चित्र लिपी अन
पायाखालील गवतावरची
तुसें रेशमी

निवांतवेळी
आभाळाच्या पाटीवरती
हिशोब मांडू बघता
उरते बाकी
चंद्र घेतला जरी हातचा
तरीही उरते बाकी.

रक्तामध्ये ओढ मातीची..........

रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन

कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे

हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे

ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर

आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरी
तुजला ध्यावे, तुजला ध्यावे

पुस्तकांतली खूण कराया

पुस्तकांतली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;
पिसाहुनि सुकुमार कांहिसे
देतां घेतां त्यांत थरारे.

मेजावरचे वजन छानसे
म्हणुन दिला नाजूक शिंपला;
देतां घेतां उमटे कांही
मिना तयाचा त्यावर जडला.

असेच कांही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा;
देतां घेतां त्यातं मिसळला
गंध मनांतिल त्याहुन हिरवा.

पत्र लिही पण......

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे
लिपीरेशान्च्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे.

चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलान्टीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिन्दूतून

शब्दामधूनी नको पाठवू अक्ष्ररामधले अधीरे स्पन्दन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कम्प विलक्शण

नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सान्गीतले मी , तू हट्टी पण !

पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मीळ्ते
पत्र त्या नन्तरचे मग वाचायाचे राहून जाते