रविवार, ३ ऑक्टोबर, २०१०

भक्ती!

बळीराजाला पेरणी मशागतीतून उसंत मिळाली... पावसाने धो, धो, कोसळून सुट्टी घेऊन... ऊन पावसाचा खेळ सुरु झाला... अंकुरलेले बीज ऊन पाणी, वार्याबरोबर डोलू लागले... किवा चैतन्याचे वारे वाहू लागले कि सण, उत्सव सुरु होतो. भक्ती अशी शक्ती आहे , कि जिच्यामुळे सर्वस्व पणाला लागले तरी, विश्वास ढळू शकत नाही. मराठी समाजाला संतश्रेष्ठांची मांदियाळी लाभलेली आहे. ज्यांनी अनेकवर्षे तलवारीच्या जोरावर जे करू शकले नाहीत ते संतांनी केवळ भक्तीच्या जोरावर साध्य केले. आत्मसमर्पणाची भावना जेव्हा वाढीला लागते तेव्हां भक्ती जन्म घेते.
पंढरपूरचा विठ्ठल अवघ्या मराठी मनाच श्रद्धास्थान. दरवर्षी आषाढी, कार्तीकेला लाखो वारकरी नित्यनेमाने पंढरपूरला जातात. पायी निघालेली वारी हा भक्तीचा महासागर असतो. समाजातल्या अठरापगड जाती एकभावनेने, एक प्रेरणेने, एक लक्षाने, एक विश्वासाने आणि एक दिलाने वारीमध्ये सामावतात. असंख्य स्त्र्र-पुरुष चैतन्याच्या वातावरणात अवर्णनीय सुखाची अनुभूती ते अनुभवत असतात. आयुष्यातल्या खाच्ख्लाग्यानी खंगत असलेल्या मनाला नवी उभारे देण्याच सामर्थ्य भक्तीमध्ये असत.
"अवघाची संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तीनही लोक
जाईन गे माये त्या पंढरपुरा
भेटेन माहेरा आपुलिया"
हि सुखाची कल्पना कीर्ती सोज्वळ, सुंदर आणि सात्विक आहे। मनाला कोंडून ठेवणे जितके कठीण तितकेच कठीण असते। मनाचे वर्णन करणे, माणूस कितीही नास्तिक असो, तो कशावरती जीव लावतोच आणि जीव लावणे म्हणजेच भक्ती जडणे, आयुष्यातील सगळेच प्रसंग एकसारखे नसतात। आणि ते नसावेतही। प्रत्येक क्षण काहीतरी नवंवा नव्याने शिकवून जातो. तो अनुभवण्याची पर्यायाने शिकण्याची कला, मात्र आपल्याकडे असावी लागते. केवळ एका आशेच्या कवडशावर आयुष्य सुसह्य करता येते.
श्रद्धा हि व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपातही असते. भक्त देवावर एकतर्फी प्रेम करत असला तरी त्यातून मिळणारी अनुभूती लाखमोलाची असते. आणि यामुळेच पावसाच्या रिपरीपित, वार्याच्या घोन्गावात काटयाकुट्याच्या रस्त्यावर डोकीवर तुळशीवृंद हेऊन वारीत सामील झालेल्या स्त्रीच्या तोंडी
" टाळी वाजवावी, गुढी उभारावी
वाटही चालावी पंढरीची!"
असेच शब्द आहेर पडतात. भक्तीला मोल नाही. सुख-दुखाचा पाढा वाचायला वेळ नाही, भक्ती फक्त भक्ती असते. ती मनातून जन्मते आणि नसानसातून भिनते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा