रविवार, ३ ऑक्टोबर, २०१०

तरुणाई


तरुणाई हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय! सर्वांचा हवाहवासा वाटणारा हा जीवनाचा टप्पा! उत्साह, धैर्य, शक्ती, बिनधास्तपणा यांनी ओसंडून वाहणारा प्रवाह! या काळात प्रत्येक जफास्ट्रकवर राहण्याची अपेक्षा बाळगून असतो. तसेच स्वतःच वेगळ विश्व निर्माण करण्याच्या घाईगडबडीत असतो. आणि हळुवार पावलांनी हे मोरपंखी दिवस कसे संपून जातात हे कळत नाही.
शिक्षण, नोकरी, व्यावसाय मित्रमैत्रिणी व जीवनसाथी निवडणे अशा अनेक आघाडयांवर एकाचवेळी लक्ष केंद्रित करायचे असते. यातच स्पर्धेच युग! या युगात स्वतःचा वेगळा कस निर्माण करण्याचे आव्हान. चालताना., बसमध्ये, वाहन चालवताना, मोबाईलवर बोलताना, काम करताना निव्वळ आणि निव्वळ धांदल.कितीही दगदग आणि तणाव असला तरी या वयाची लज्जतच काही और असते यामुळे तरुणाई नेहमीच स्मरणात राहते.
तरुणाई म्हणजे उत्साह. उमेद, प्रेम आणि धैर्याचा सुरेख मेळ....! कालानुरूप तरुणाई मधेही खूप फरक पडतो. कुठे बनगरवाडीतील धोतराचा सोगा पकडून शाळेतील विद्यार्थी शोधणारा तरुण शिक्षक तर कुठे आजचा इंग्रजी हाय-फाय बोलत बीपीओ, कॉलसेंटरमध्ये गडगंज पैसा कमावणारा तरुण.यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तरुणाई म्हणजे हुरहूर, तरुणाई म्हणजे दगदग.... तरुणाई म्हणजे बडबड तरुणाई म्हणजे गडबड, गोंधळ
तरुणाईचा काळ म्हणजे नाविन्याचा शोध घेण्यासाठी निसर्गाने उभारलेल मुक्त विद्यापीठ. जिज्ञासा, निकोप दृष्टीकोन आणि समजूतदारपणा यामुळे जीवनाला गहीरेपानाचे रंग प्राप्त जातात. या उमेदीच्या काळात माणूस घडत असतो, भरारी घेत असतो, बिघडत असतो, कोसळत असतो. मात्र त्याच्या पाहणार्याच्या दृष्टीकोनावर बदल घडत असतात. हा काळ जितका लाभदायक, तितकाच धोकादायक. तरुणाईच्या नाक्यावर अनेक वाटा फुटलेल्या असतात. मनाला आवरणे अतिशय कठीण होऊन जाते. येथून फक्त एकाच वाट निवडावी लागते. जी पुढे आपली जीवनरेषा होऊन जाते.
प्रचंड शक्तीचा अदभूद साठा असलेल्या तरुणाईचा वापर झाल्यास अनेक विधायक कार्ये अगदी सहजपणे होऊन जातात. याची अनेक उदा. देता येतील. पण व्यसनाधीनतेच्या गर्केत वाढणारी तरुणाई विघातक ठरतात. यामुळे तरुणाई हा अमुल्य वेळ आहे. याचा वापर फुलण्यासाठीच करावा.
वय हलक्या हलक्या पावलांनी जरी निघून जात असले तरी मनाने सदैव तरुण राहिलेल्या तरुणाईची गर्द निळाई अनुभवण्यास येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा