शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

पाऊस आला कि...


पाऊस आला कि भिजावेसे वाटते
पण भिजली कि तुझी आठवण येते

चिंब पावसात मी तुझ्याबरोबर भिजायची
छत्री असूनही ती बंद असायची

चिखलात तू मुदाम्हून चालायचास,
मी ओरडेन तुला हि वात पहायचास

वाटेतल्या स्टॉलवर जाऊन चाय पीत बसायचो
आपण तेंव्हा किती गप्पा मारायचो

मला मात्र तुझा खूप राग यायचा,
कारण तू पावसात नेहमी भिजायचा,

भिजून तू आजारी पडू नये ही भीती वाटायची
तुला काही होऊ नये हीच काळजी असायची

जोरात पाऊस आला कि आजही तुझी काळजी वाटते,
तू भिजत तर नाहीस ना म्हणून मनास भीती वाटते

पाऊस आला कि भिजावेसे वाटते
पण भिजली कि तुझी आठवण येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा